Saturday 16 April 2016

प्रश्न

मला पडले प्रश्न चार
नाहीत तसे कठीण फार

समुद्र मोठा कि मोठा सुर्य?
इवल्या त्या समुद्राचे कोण मोठे धैर्य!
सुर्य जळतो, पृथ्वी पाळतो
मावळतीला इवल्याश्या समुद्रात गळतो

माणूस वाईट कि वाईट गुण?
आईच्या पोटात असतात सगळेच भ्रूण 
कोणी काळा दगड कधी वाळीत पडतो
त्यातलाच कुणी एक कधी वाल्मिकी घडतो

तिसरा प्रश्न मी कोण?
कोणीही नाही

चौथा प्रश्न माझा मला
विचारायचा राहून गेला
कागदी होडीतून वाहून गेला
नावाडीपण बुडून मेला


-विवेकानंद सामंत
पवई, २००४ 


No comments:

Post a Comment