Sunday 13 February 2022

fragmented

तिथे पोचून परत इथे यायचं आहे . तिथेच राहता येणार नाही. कारण तिथे राहण्यासाठी जागा नाही. राहण्यासाठी जागा इथेच आहे. तिथे खायला अन्न सापडणार नाही. ज्याची आपल्याला गरज आहे. पाणी नाही तिथे, हवाही नाही, आपल्याला जगण्यासाठी या गोष्टींची गरज आहे आणि त्या तिथे नाहीत. म्हणून आपल्याला परत इथे यावे लागेलच.
आणि आपल्याला पुन्हा सगळ्याची ओळख करून घ्यावी लागेल, नुसती ओळखच नाही तर त्याचा स्वीकारही करावा लागेल. मन एवढं खुलं असलं पाहिजे, की त्यात काहीही येऊ शकतं, सगळ्या गोष्टी त्याला स्वीकारसम आहेत, स्वागतार्ह आहेत, कुठलीही गोष्ट वर्ज्य नाही, कुठल्याही गोष्टीला आडकाठी नाही. तिथे जाऊन परत आलो म्हणून आपण बदलत नाही. फक्त porus होतो. छिद्रांनी बनलेले. ज्या छिद्रांतून सगळं आत येऊ शकतं आणि सगळं बाहेर जाऊ शकतं.
 ओहारान पामुक, कोबो अबे हे का लिहितात? स्वतःसाठी लिहीत असतील तर त्यांना ते दुसऱ्यांना दाखवण्याची गरज काय? 'पूर्णत्व' हे त्याचे कारण आहे का? गोष्टींना तोपर्यंत महत्व येत नाही जोपर्यंत observer त्यांना बघत नाही. त्यांना तोपर्यंत अस्तिव नाही त्यांचं अस्तित्व तोपर्यंत सिद्ध होत नाही जोपर्यंत त्यांना बघणारा, अनुभवणारा मिळत नाही म्हणूनच लोकं लिहितात, चित्रं काढतात? observer ची गरज आपल्याला नाकारता येत नाही. जोपर्यंत observer नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही. हा इन्स्टिंक्ट आपण जेव्हा निर्माण होतो तेव्हाच आपल्या अस्तित्वाचा भाग बनून  निर्माण होतो काय? त्यामुळेच relate करणे हे आपल्या basic need चा भाग आहे का? ही fundamental गरज आहे का?
तो एक छोटा साधा कुत्रा आहे माझ्या बिल्डिंगच्या बाहेर. आजकाल थंडीमुळे तो एका वाळूच्या ढिगाऱ्यामधे एक खोलगट खड्डा करून त्यात बसतो आणि आपल्या पायांवर तोंड मुडपून गप्प डोळे मिटून राहण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला बघितले, म्हणून तो आहे हे मला कळले, मी त्याला बघितलेच नसते तर तो आहे याचे ज्ञान मला कसे झाले असते? त्याचे तसे बसणे मला affect करते, त्याच्या त्या स्थितीला मी 'गरीब' असे लेबल लावले आहे. हे लेबल मला कुठून मिळाले, तो 'गरीब' आहे का? पण हे माझे त्याच्या स्थितीचे केलेले अवलोकन आहे. म्हणजे फक्त त्याचे अस्तित्व/असणे पुरेसे आहे. त्या अस्तित्वाचे खरे रूप/सत्य जाणण्याची मला गरज नाही.

सतत चांगलं वाटण्याची सक्ती. चांगलं वाटावं म्हणून आपण का प्रयत्न करतो. मूल जरा कुणी बाजूला गेले की का रडते? कुरकुरते? त्याला का पाहिजे कोणी? एकटं असणं त्याला का सहन होत नाही? अगदी जन्मापासून. ते जेव्हा सर्वप्रथम अस्तित्वात येते तेव्हा ते का रडते? त्याला कसले दुःख होते? दुःख म्हणजे काय आणि दुःख होते म्हणजे तरी काय?

भीती आहे. सगळ्यात बेसिक .. एक्सिस्टन्स च्या पायथ्याशी काय आहे?
मग वर भीती आहे? कसली

माणूस फक्त descisions घेत असतो. अथ पासून अंतापर्यंत


सतत चांगलं वाटण्याची सक्ती. चांगलं वाटावं म्हणून आपण का प्रयत्न करतो. मूल जरा कुणी बाजूला गेले की का रडते? कुरकुरते? त्याला का पाहिजे कोणी? एकटं असणं त्याला का सहन होत नाही? अगदी जन्मापासून. ते जेव्हा सर्वप्रथम अस्तित्वात येते तेव्हा ते का रडते? त्याला कसले दुःख होते? दुःख म्हणजे काय आणि दुःख होते म्हणजे तरी काय?

भीती आहे. सगळ्यात बेसिक .. एक्सिस्टन्स च्या पायथ्याशी काय आहे?
मग वर भीती आहे? कसली

माणूस फक्त descisions घेत असतो. अथ पासून अंतापर्यंत

No comments:

Post a Comment